Thursday, May 17, 2012

मनातलं मळभ


आनंद उवाच.....................

आतातरी पाऊस थांबेल असं वाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझं येणं एक सुंदर पहाटस्वप्न होतं,
सर्वत्र तुझं असणंच माझं सर्वस्व होतं,
सारं स्वप्नंच आता हळुहळु फाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुजसाठी शिवधनुष्य तोडले असते,
ते तुटलेले धागेही सहज जोडले असते,
नियतीच्या पोटात मात्र वेगळंच काही घाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

तुझ्यात "मी" चा माझ्या पुरता निचरा झाला होता,
विश्वात आपल्या मात्र स्वजनांचा कचरा आला होता,
व्यवहाराचं किल्मिष मनात दुकान थाटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

दोनाचे चार कुठे गेले, शुन्यच येते आता बाकी,
ढासळले महाल सुखांचे, उरल्या खिंडारांची झांकी,
गणितंच सारी चुकलीयेत, राहुन राहुन पटतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय,

एव्हढा पावसात भिजुनसुद्धा मन पुर्ण सुकलंय,
जुनाट वठलेल्या पिंपळासम धरेपार झुकलंय,
वैषम्याचं हलाहल हळुहळु पसरत साठतंय,
मनातलं मळभ मात्र अजुनच दाटतंय..................................................

No comments: