Thursday, June 14, 2007

मनाचे श्लोक

आनंद उवाच.................


नको रे मना धरु गर्व वृथाचा । नाशासी नेई मार्ग आयुष्याचा ।
अहंभावे करीसी वृत्तीस कोते । सुखास लागे जर हा क्षयाचा ॥

अहंगंडाने होई माती कार्याची । कर्तुत्वास ग्रासे छाया ग्रहणाची ।
नको रे मना जाउ "अहं"च्या आहारी । अभिमान त्यजताच प्राप्ति होई फळाची ॥

अहंकार गळुनी जाऊदे "मी" पणा हा । मळभ दुर करुनी पसरु दे तु प्रकाशा ।
पसरुनी बाहू घे मोकळासा श्वास । सामावुन घे पूर्ण तु अवकाशा ॥

विसर्जिता अहंकार दिसे दिव्य तेज । ज्ञानास येई नम्रतेचा जो साज ।
आत्म्यास येई झळाळी परमात्म्याची ॥ हुंकार देई अंतरात्म्याचा आवाज ॥