आनंद उवाच...............................
पहिल्या पावसाची पहिली सर,
तुझीच आठवण घेऊन आली,
आसुसलेल्या माझ्या मनाला,
हळुवारपणे भिजवुन गेली,
ऊरात माझ्या भरुन गेली,
मंद सुवास ओली माती,
चित्त आले बहरुनी माझे
हात घेता तुझाच हाती,
स्पर्श तुझा होता मजला,
मनात वाही तुफान वारा,
कल्पनेच्याही पलिकडे नेई,
वाहुन मज प्रेमाच्या धारा,
कडाडुन येई मग वीज अशी ही,
लगबग मग तु बिलगुन जाशी,
एकरुप मग होऊन मजसवे,
साधिशी संवाद तु ह्रुदयाशी,
असेच वेडावुन माझे मन,
बेभान करुन टाक कायमचे,
व्यापुन दुनिया सारी माझी,
स्वप्न असुदे तुझ्याच प्रीतीचे,
स्वप्न असुदे तुझ्याच प्रीतीचे.........................
3 comments:
hi anand.
Khupach premal kavita aahe.
keep goin man.
aasach chaan chaan lihit jaa.
good wishes
shweta - anushree
वाह! क्या बात है!
मस्तच जमली आहे कविता.
तुमचा ब्लॉग आजच पाहण्यात आला. आता नियमित भेट होईल.
शुभेच्छा.
आनंद,
साखळी हायकूसाठी खॊ दिलाय बघ.
-प्रशांत
Post a Comment