आनंद उवाच...............
सुखाच्या राशीवर भारावुन सुद्धा
मनमुराद स्वच्छंदी जगता आले पाहीजे
रथ चार अंगुळे आभाळात ठेउन
जमिनीवर मात्र चालता आले पाहीजे
दु:खाच्या डोहात खोल खोल बुडुन
आयुष्य असेच काही संपत नाही
अरिष्टांच्या हलाहलाचे प्याले रिचवुन
निळकंठ होऊन जगता आले पाहीजे
सांडायचा नसतो हा मनाचा कोंडमारा
फुका का दवडावी मनाची सुप्त शक्ती?
भरधाव सोडण्या कर्तुत्वाच्या वारुस
कोंडमाऱ्याचे इंधन करता आले पाहीजे
निधड्या छातीने निर्घृण वार झेलणे
वाट का पहावी या बेफिकीर क्षणांची?
ओळखुन नेमके आपले ते जिवघेणे शत्रु
लढ्यास समोर पाय रोवता आले पाहीजे